शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राज्यघटनेला बाजूला ठेवून देशात कारभार : वसंत भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:08 IST

बेळगाव : राज्यघटना बाजूला ठेवून समांतर कारभार सध्या देशात सुरू असल्याचे चित्र आहे आणि लोकशाहीसाठी ते अत्यंत घातक आहे, ...

ठळक मुद्देयामुळे सामाजिक विषमतेची मोठी दरी निर्माण होऊ लागली आहे.समितीचे ज्येष्ठ नेते दीपक दळवी यांच्यासारख्यांनी त्यासाठी आपले आयुष्य वेचले आहेबेळगावबाहेरच्या मराठी भाषिकांचीही साथ आहे असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते

बेळगाव : राज्यघटना बाजूला ठेवून समांतर कारभार सध्या देशात सुरू असल्याचे चित्र आहे आणि लोकशाहीसाठी ते अत्यंत घातक आहे, त्यामुळे वेळीच सावध व्हायला हवे, असे मत ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

येथील ज्योती महाविद्यालयात दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ आणि दि सह्याद्री को-आॅप. सोसायटी लिमिटेडच्या वतीने महात्मा जोतिराव फुले स्मृतिदिनानिमित्त आयोजित महात्मा फुले व्याख्यानमालेतील ‘राज्यघटना आणि सद्य:स्थिती’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफतानाभोसले बोलत होते. अध्यक्षस्थानी बेळगाव दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. राजाभाऊ पाटील होते.

भोसले म्हणाले की, गेल्या काही वर्षांत संविधान बचाव आंदोलन सुरू झाले आहे. याला कारण सरकारचा व्यवहारच संशयास्पद वाटतो आहे. एवढेच नाही, तर राज्यघटनेचा वापर निवडणुकीपुरता करून आपल्याला हवा तसा कारभार चालविता येईल अशी समांतर व्यवस्था आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याचे सध्याचे देशातील चित्र आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वांशी फारकत सुरू आहे. त्यामुळे घटना बदलणे किंवा त्यामध्ये सुधारणा या गोष्टी आता मागे पडल्या आहेत.

राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता, सर्वांना शिक्षण आणि विकासाची संधी देण्याच्या तत्त्वांबाबतही असेच चित्र आहे. सर्वसामान्यांसाठी शिक्षण आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे ज्याच्याकडे पैसा आहे, तोच शिक्षण घेणार आणि पुढे जाणार आहे. यामुळे सामाजिक विषमतेची मोठी दरी निर्माण होऊ लागली आहे.

महाराष्ट्र शेतकऱ्यांची स्मशानभूमी बनल्याचे वक्तव्य ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी अलीकडे केले आहे. यावरून शेतकºयांची अवस्था लक्षात येते. शेती, शेतकरी, कामगार व असंघटित कामगारांसह रोजंदारी कर्मचाºयांची स्थिती चिंतनीय झाली आहे. समाजातील ७० टक्के वर्गाची अशी स्थिती झाली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर समाजात विघटन होण्याचा मोठा धोका आहे, असा इशाराही भोसले यांनी दिला.

तत्पूर्वी म. फुले स्मृतिदिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांची भाषणे झाली. त्यांनी महिलांना समान हक्क कधी मिळणार असा सवाल शबरीमाला, शनिशिंगणापूर यासारखी महिलांच्या मंदिर प्रवेशाच्या लढ्याची उदाहरणे देऊन केला. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दीपक दळवी यांना अश्रू अनावरसंपादक वसंत भोसले यांनी आपल्या व्याख्यानात सीमाप्रश्न आणि काश्मीरच्या प्रश्नाने मी व्यथित होतो, असे सांगून मराठी भाषिक बहुसंख्येने असल्याने महाराष्टत सामील होण्याचा त्यांचा हक्क डावलला गेला आहे. तो मिळविण्यासाठी महाराष्टÑ एकीकरण समितीचा लढा अव्याहतपणे सुरू आहे. समितीचे ज्येष्ठ नेते दीपक दळवी यांच्यासारख्यांनी त्यासाठी आपले आयुष्य वेचले आहे, असे सांगताच श्रोत्यांमध्ये असलेले दीपक दळवी अत्यंत भावुक झाले. व्याख्यानानंतर व्यासपीठावर येऊन त्यांनी संपादकांना आलिंगन दिले. आपल्या लढ्याला बेळगावबाहेरच्या मराठी भाषिकांचीही साथ आहे असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. सीमाप्रश्नासाठी आयुष्याच्या अखेरपर्यंत लढत राहण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :belgaonबेळगावmarathiमराठीkolhapurकोल्हापूर