शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

राज्यघटनेला बाजूला ठेवून देशात कारभार : वसंत भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:08 IST

बेळगाव : राज्यघटना बाजूला ठेवून समांतर कारभार सध्या देशात सुरू असल्याचे चित्र आहे आणि लोकशाहीसाठी ते अत्यंत घातक आहे, ...

ठळक मुद्देयामुळे सामाजिक विषमतेची मोठी दरी निर्माण होऊ लागली आहे.समितीचे ज्येष्ठ नेते दीपक दळवी यांच्यासारख्यांनी त्यासाठी आपले आयुष्य वेचले आहेबेळगावबाहेरच्या मराठी भाषिकांचीही साथ आहे असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते

बेळगाव : राज्यघटना बाजूला ठेवून समांतर कारभार सध्या देशात सुरू असल्याचे चित्र आहे आणि लोकशाहीसाठी ते अत्यंत घातक आहे, त्यामुळे वेळीच सावध व्हायला हवे, असे मत ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

येथील ज्योती महाविद्यालयात दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ आणि दि सह्याद्री को-आॅप. सोसायटी लिमिटेडच्या वतीने महात्मा जोतिराव फुले स्मृतिदिनानिमित्त आयोजित महात्मा फुले व्याख्यानमालेतील ‘राज्यघटना आणि सद्य:स्थिती’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफतानाभोसले बोलत होते. अध्यक्षस्थानी बेळगाव दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. राजाभाऊ पाटील होते.

भोसले म्हणाले की, गेल्या काही वर्षांत संविधान बचाव आंदोलन सुरू झाले आहे. याला कारण सरकारचा व्यवहारच संशयास्पद वाटतो आहे. एवढेच नाही, तर राज्यघटनेचा वापर निवडणुकीपुरता करून आपल्याला हवा तसा कारभार चालविता येईल अशी समांतर व्यवस्था आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याचे सध्याचे देशातील चित्र आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वांशी फारकत सुरू आहे. त्यामुळे घटना बदलणे किंवा त्यामध्ये सुधारणा या गोष्टी आता मागे पडल्या आहेत.

राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता, सर्वांना शिक्षण आणि विकासाची संधी देण्याच्या तत्त्वांबाबतही असेच चित्र आहे. सर्वसामान्यांसाठी शिक्षण आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे ज्याच्याकडे पैसा आहे, तोच शिक्षण घेणार आणि पुढे जाणार आहे. यामुळे सामाजिक विषमतेची मोठी दरी निर्माण होऊ लागली आहे.

महाराष्ट्र शेतकऱ्यांची स्मशानभूमी बनल्याचे वक्तव्य ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी अलीकडे केले आहे. यावरून शेतकºयांची अवस्था लक्षात येते. शेती, शेतकरी, कामगार व असंघटित कामगारांसह रोजंदारी कर्मचाºयांची स्थिती चिंतनीय झाली आहे. समाजातील ७० टक्के वर्गाची अशी स्थिती झाली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर समाजात विघटन होण्याचा मोठा धोका आहे, असा इशाराही भोसले यांनी दिला.

तत्पूर्वी म. फुले स्मृतिदिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांची भाषणे झाली. त्यांनी महिलांना समान हक्क कधी मिळणार असा सवाल शबरीमाला, शनिशिंगणापूर यासारखी महिलांच्या मंदिर प्रवेशाच्या लढ्याची उदाहरणे देऊन केला. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दीपक दळवी यांना अश्रू अनावरसंपादक वसंत भोसले यांनी आपल्या व्याख्यानात सीमाप्रश्न आणि काश्मीरच्या प्रश्नाने मी व्यथित होतो, असे सांगून मराठी भाषिक बहुसंख्येने असल्याने महाराष्टत सामील होण्याचा त्यांचा हक्क डावलला गेला आहे. तो मिळविण्यासाठी महाराष्टÑ एकीकरण समितीचा लढा अव्याहतपणे सुरू आहे. समितीचे ज्येष्ठ नेते दीपक दळवी यांच्यासारख्यांनी त्यासाठी आपले आयुष्य वेचले आहे, असे सांगताच श्रोत्यांमध्ये असलेले दीपक दळवी अत्यंत भावुक झाले. व्याख्यानानंतर व्यासपीठावर येऊन त्यांनी संपादकांना आलिंगन दिले. आपल्या लढ्याला बेळगावबाहेरच्या मराठी भाषिकांचीही साथ आहे असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. सीमाप्रश्नासाठी आयुष्याच्या अखेरपर्यंत लढत राहण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :belgaonबेळगावmarathiमराठीkolhapurकोल्हापूर